*शेतकऱ्यांनी आपला सातबारा नेऊन दाखवावाच कारण तुम्ही जर सातबारा दिला नाही तर बोगस ड्रमधारक ड्रम घेऊन उभे राहतील आणि आम्ही शेतकरी आहोत असे सांगून तुमचीच डिझेल पळून नेतील त्यामुळे सातबारा काढणे काही शेतकऱ्यांसाठी विशेष नाही एक सातबारा काढून खिशात ठेवला तर तुम्हाला तो दैनंदिन कामास येईल हे लक्षात ठेवा सरकारने जाहीर केले आहे ना तर सरकारने तुमच्यासाठी चागले पाऊल ऊचलले आहे राजकारणीन मागे लागु नका – राजेद्र वाघ.*
शेतकऱ्यांसाठी डिझेल घेणंही आता कठीण होत चाललं आहे का? राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी सातबारा मागितला जात असल्याच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेती मशागतीसाठी डिझेल अत्यावश्यक आहे. अशावेळी शेतकऱ्यांना अतिरिक्त कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकवल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना त्रास दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुमच्या भागातही डिझेलसाठी सातबारा मागितला जातो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.








