राजु भास्करे/ अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदरा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या ठिकाणी जलजिवन मिशन नळाचे कामे झाले आहे परंतु काही काही गावाच्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने कत्राटदाराने नळ जोडनीत आपली मनमनानी केली असल्याचे दिसुन येत आहे।
चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार या गावात जवळपास ४०० नळजिवन मिशन चे नळजोडणी चे कामे एका वर्षा पासुन पुर्ण झाले आहे परंतु येथिल काम करणारा कंत्राटदाराने नळजोडणी कामे थातूरमातूर केले असल्याने येथिल नळाचे बाधकाम तुटुन पडून असल्याचे दिसून येत आहे.
बोलल्या जात आहे की गौलखेडा बाजार येथिल काही नळाच्या जागी पाणि येत नसुन ते बंद अवस्थेत आढळून येत आहे.
आशा हलगरजी काम करणार्या कत्राटदारावर तसेच शासनाचे पैसे चे तिनतेरा करणार्या कत्राटदारावर कडक कारवाई झाली पाहिजे असा जोर गोलखेडा बाजार येथिल नागरीक करीत आहे.
तरी पण शासनाने गौलखेडा बाजार येथिल तसेच चिखलदरा तालुक्यातील जलजिवन मिशन चे नळजोडणीची पाहणी करुन थातूरमातूर काम करणार्या कत्राटदारावर कडक कारवाईचे करण्यात यावे अशी मागणी गावातील नागरिक जोर धरत आहे.