Search
Close this search box.

आत्मतत्त्व हे विश्वव्यापक चैतन्य : परमात्मराज महाराज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : सद्धर्माचे आचरण करून अंतःकरणात मानवतेचे मंदिर बांधणे आवश्यक आहे. सत्स्वरूप म्हणजे आत्मतत्व हे विश्वव्यापक चैतन्य एकच आहे. हे धर्माचरणाद्वारेस समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. आडी (निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, धर्माशी अखंड संबंध स्थापित ठेवून जीवनाची वाटचाल करीत राहणे आवश्यक आहे. वसिष्ठ ऋषींच्या उपदेशानुसार अश्वपती राजाने सावित्री मंत्राचा दहा लाख जप केल्यामुळे त्याला मुलगी झाली. सावित्रीदेवीच्या नांवावरून त्या मुलीचे नांवही सावित्री असेच ठेवले. पुढे त्याच सावित्रीने दोन्ही कुळांचा उद्धार केला. आजच्या काळात मुलगी झालीतर काहींना वाईट वाटते. सावित्रीने पतिनिष्ठा ठेवून व पतीसेवा करून मुलगी आणि पत्नी म्हणून ही आदर्श ठेवला आहे. सावित्रीच्या धर्माचरणाचा बोध घेऊन मुलगीला कमी समजू नये. अनेक विभूती होऊन गेल्या. त्यांनी धर्माचरण केले. ते सद्धर्माचरणा संबंधित आदर्श ठरले. धर्मावर विश्वास असल्यास अध्यात्म मार्गाने वाटचाल घडते. महाभारताच्या वनपर्वातील आख्यानात सत्यभामा व द्रौपदी संवादात सत्यभामाने पतीला ताब्यात ठेवण्यासाठी उपाय द्रौपदीकडे विचाराला. तेव्हा मंत्र, वशीकरण, जडीबुटीने पतीला मुठीत ठेवता येत नाही. तर पतीसेवा, आणि धर्माचरणाने वागून पतीला आपल्या अनुकूल ठेवता येते असे सांगून उपदेश केला.
जीवनात धर्माने वागण्याला फार महत्व आहे. धर्माने वागण्याचे बंधन सर्वांना आहे. अवतारी महापुरुषांनी ही धर्माचरण करून आदर्श स्थापित केला आहे. जनतेकडून धर्मपालन व्हावे यासाठी अवतार होत असतात. कित्येक लोक धर्म वाङ्गमय वाचत नाहीत. माणसाने सुरवातीपासूनच धर्माने वागावे. वाईट वागणाऱ्या व्यक्तीत नंतर जरी सुधारणा झाल्या तरीही काही जुन्या खूणा राहण्याची शक्यता असते. त्याही नको म्हणून लहानपणापासूनच म्हणून धर्माचरणाला अतिशय महत्व आहे. धर्माशी अन्वय कसा साधावा या चिंतनात असावे. क्षूद्र भौतिक स्वार्थासाठी माणूस अधर्माचा मार्ग स्वीकारत असतो ते वाईट आहे.
यावेळी हणबरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली. यावेळी बाळासो अर्जुन पोवाडे हणबरवाडी, जगन्नाथ सिध्दू खोत हणबरवाडी, रोहित सुभाष कुंभार तळंदगे, सुरेश बस्तवडे हंचिनाळ, दत्ता कुंभार म्हाकवे आदी देणगीदार तसेच महाराष्ट्र पणन महासंघ मुंबईच्या संचालकपदी निवड झाल्याबदल सौ धनश्रीदेवी धनराज घाटगे यांचा प .पू .परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आडी, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, हंचिनाळ, सुळकूड, म्हाकवे, आणूर, कागल, निपाणी पंचक्रोशीसह बेळगांव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड जिल्ह्यातील कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन