Search
Close this search box.

चिंदर येथे वनविभागाकडून विहिरीत पडलेल्या कोह्यांनची सुटका…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आचरा-विवेक परब

वन्यजीव विहिरीत पडल्याची घटना घडल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क करण्याचे — परिमंडळ वनाधिकारी श्रीकृष्ण परीट

उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे तसेच वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने व जंगलांनवर होणारे मानवी अतिक्रमण यामूळे वन्यप्राण्याचे हाल होऊन ते पाण्याच्या व शिकारीच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे वळत आहेत.
चिंदर बाजार येथील ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मधुकर मांजरेकर यांच्या स्वमालकीच्या विहिरीत दोन कोल्हे पडल्याचे वृत्त दुपारी वनविभागाला समजले. तात्काळ घटनास्थळी दाखल होत उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली चिंदर पोलीस पाटील दिनेश पाताडे व ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन्ही कोल्ह्यांना सुखरूप रेस्क्यू करून पशुधन विकास अधिकारी तुषार वेर्लेकर यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून घेतली नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. कोल्हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 ने त्याला संरक्षित करण्यात आले आहे सदरची मोहीम वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर शरद कांबळे, वनसेवक अनिल परब, वाहन चालक राहुल मयेकर, ग्रामस्थ विक्रांत आचरेकर, धनंजय कांबळी, ओंकार वळजू, राजू पडवळ, मुन्ना पडवळ, अमोल पडवळ या सर्वांनी मिळून पार पाडली. वन्यजीव विहिरीत पडल्याची घटना घडल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क करण्याचे आवाहन परिमंडळ वनाधिकारी मालवण श्रीकृष्ण परीट यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें