पुणे रिपोर्टर अभिषेक व्यास.
आजच्या धकाधकीच्या जीवनात व बदलत्या काळात पारंपारिकता लोप पावत असुन संस्कार व नितीमुल्यांचा ऱ्हास होत चाललेला दिसत आहे.आता लहानमुले देवापुढे,देवघरात फिरकतच नाहीत.मोबाईलवर गेम खेळत बसतात त्यामुळे पुर्वी देवासमोर देवघरात होणारी शुभंकरोती आई वडिल,आजी आजोबांचा घेतला जाणारा आशिर्वाद हे क्वचितच ठरले आहे वडिलधाऱ्यांच्या आज्ञेत राहणारी पिढी नष्ट होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
अधुनिक हिंदुस्थानच्या निर्माणामध्ये हिंदुस्थानच्या संस्कृतीला अतिशय महत्व आहे.जगभरातील सर्वश्रेष्ठ अशी हिंदुस्थानची संस्कृती की ज्या संस्कृतीने अनेक विचारवंत थोर महापुरुष घडविले परंतु २१व्या शतकामध्ये धकाधकीच्या जीवनात बदलत्या काळात माणसाचे राहणीमान बदलले परंतु हा बदल प्रणालीच्या दिशेने जरी असला तरी त्या प्रगतीमध्ये संस्कृती हरवत चालली आहे.तरूण तरूणी या बदलामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वत:ला झोकुन देत आहे की आधुनिक बदलत्या काळामध्ये तरूणाई हरवुन बसली आहे.बदलत्या काळामुळे मुले मोबाईल मध्ये गुरफटून गेली आहेत.पालकही शाळेचे व अभ्यासाचे नको इतके ओझे त्यांच्यावर टाकत आहेत.त्यामुळेच मैदानावर खेळणारी मुले आता अपवादानेच दिसत आहेत. त्यामुळे कदाचित मुलांचा बुद्ध्यांक वाढला तरी त्यांचे आयुष्यमान मात्र घटत चालले आहे.पुर्वीसारखी गुरूकुल सारखी शिक्षणपध्दती उरली नाही.
पाटीवरती श्री गणेशा करून आकडेमोड करणारी मुल आता संगणकावर गणित सोडवु लागली आहेत.अंगात फाटके तुटके कपडे घालुन चड्डीला ठिगळे लावुन क्षिक्षणाचा धडाघेण्यासाठी जाणारी मुल आता सुटबुटात मोटारसायकलवरून शाळेत जात आहेत.त्यामुळे सगळे कसे बदलत चाललय हे डोळ्यासमोर दिसत आहे जाणवत आहे.