राजुर प्रतिनिधी – नुकत्याच वीज वितरण कंपनीने जाहीर केले आहे की सर्व राजूर मधील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर जोडले जातील परंतु हे स्मार्ट मीटर मुळे
गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त बिल येत आहे असे संपूर्ण महाराष्ट्राच्या निदर्शनास आले आहे तसेच सन्माननीय वीज मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सुद्धा असे नमूद केले आहे की स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येऊ नये मग वीज वितरण कंपनी पुढच्या पुढे या मीटरच्या सक्तीचे आदेश का देत आहे असा सवाल भारतीय मीडिया फाउंडेशनचे अकोले तालुका अध्यक्ष मा. रोहिदास लहामगे यांनी केला आहे.
जर वीज वितरण कंपनीने हे स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती राजुर मध्ये केल्यास राजूर मधील असंख्य नागरिकांना घेऊन भारतीय मीडिया फाउंडेशन अकोले तालुका कमिटी राजूर वीस वितरण कंपनी च्या कार्यालयावर मोठे जन आंदोलन उभारेल याची नोंद राजूर वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाने घ्यावी.









