Search
Close this search box.

भाजपच्या निवेदनाची दखल न घेतल्या बद्दल वेंगुर्ले नगरपरिषदेची जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे कडे तक्रार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

  • संबंधितांवर कारवाई झाली नाही तर पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग

भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी, वेंगुर्ले नगरपरिषदच्या नावे प्रशासकीय कार्यकाळ सुरु झाल्यापासूनची कार्यालयामार्फत झालेल्या विविध विकासकामांची माहीती मागितली होती.
यामध्ये शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवलेल्या कामांची नावे, प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामाची यादी, निविदा प्रक्रीया केलेल्या कामांची यादी, कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांच्या आदेशाची प्रत, कंत्राटदाराच्या कामासह पुर्ण केलेल्या कामांच्या अदा केलेल्या बिलांची माहीती, कंत्राटदारांने निविदा भरताना कमी दराने भरुन सुद्धा, अंतिम बिलाच्या वेळी वाढीव रक्कम अदा केलेल्या कामांची माहीती ( वाढीव कामांच्या अंदाजपत्रकासह ), झालेल्या विकास कामामध्ये वापरण्यात आलेली खडी / वाळु / बोल्डर इत्यादी साहीत्यांचे शासकीय नियमानुसार परवान्याची माहीती ( राॅयल्टी पास ) इत्यादी माहीती दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदनाद्वारे मागितली होती. परंतु सात महीने झाले तरी वेंगुर्ले नगरपरिषदेकडुन अद्याप कोणतीही माहीती प्राप्त झाली नाही.
खर तर वेंगुर्ले नगरपरिषदेस राज्य सरकार व केंद्र सरकार च्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला, परंतु लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाने ठेकेदारांना हाताशी धरून गरज नसलेल्या ठिकाणी निधी खर्ची घालून शासनाच्या निधीचा अपव्यय केला. याबाबत माहीती मिळण्याबाबत निवेदन सादर केले असता अद्याप कोणत्याही प्रकारची माहीती दिली नाही. म्हणूनच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची दाखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली नाही तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे प्रसंन्ना(बाळ) देसाई यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें